Posts

Showing posts from April, 2023

१०० वर्षे जगण्याचे जापानी सिक्रेट

Image
   शंभर वर्षे जगण्याचं जपानी सिक्रेट   शंभर वर्षे जगण्याचं जपानी सिक्रेट    मित्रांनो  'आरोग्यम धनसंपदा ' मध्ये आपले स्वागत आहे. ईकिगाई   आपल्याला आवडेल तेच करतात जापानी लोकांच वैशिष्ठ्य आहे.की त्याना ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यातच करीअर करतात.आणि  उत्साही शरीर उत्साही मन. तणावाचा फायदा घेण्याची  कला.त्यांच्यामध्ये आढळते. सावकाश खा 80% खा 32 वेळा चावून खा सावकाश खाणं. आणि आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्या 80 टक्केच खाणं हे त्यांच्या आहाराचे वैशिष्ट्य ते केव्हाही आपली भूक आहे त्याच्या 80 टक्केच खातात त्यामुळे खाल्लेले व्यवस्थित पचन होतं आपल्याकडे ही म्हण. आहे की प्रत्येक घास 32 वेळा चावून खा   जीवनात उद्दिष्ट शोधा जपानी लोक आपल्या जीवनाचं एक उद्दिष्ट शोधतात. आणि त्या उद्दिष्टानुसार मार्गक्रमण करत राहतात. स्ट्रेस रहित  जीवन जगण्यासाठी हे महत्त्वाचे आहे जीवनात उद्दिष्ट असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो. स्वतःला प्रश्न विचारा   आयुष्यामध्ये स्वतःला प्रश्न विचारलं जरूर आहे त्यामुळे आयुष्याच्या वनावर योग्य रस्ता सापडतो   भरपूर चाला...

निरोगी आरोग्याची त्रिसूत्री

Image
 निरोगी आरोग्याची त्रिसूत्री निरोगी रहाण्याची  त्रिसूत्री   मित्रांनो  'आरोग्यम धनसंपदा ' मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहतोय की दवाखान्यांची संख्या वाढत चालली आहे.पेशंटच्या संख्येत वाढ होत आहे आणि सर्वसामान्यापासून  स्वस्थ कसं राहावं हे लपवलं जातय . आणि जास्तीत जास्त लोक आजच्या या परिस्थितीत स्वस्थ  कस राहावे  यासाठी धडपडत आहेत.यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याच्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पाहिलं तर आपण काय खातो तर चपाती ,भाकरी ,भाजी ,भात ,डाळ आता आपण पालेभाज्या किती खातो आणि पालेभाज्या किती प्रमाणात खातो? तर खूपच कमी प्रमाणात आपण खातो.परिणामी आपण सर्दी खोकला या आजारांना बळी पडतो व आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते परिणामी त्यातूनच मोठे आजार जन्म घेऊ लागतात.  जेव्हा आपण भाज्या शिजवतो तेव्हा शिजवल्यानंतर त्याच्यातील जे पोषक तत्त्व आहेत ते नष्ट होतात त्याच्यामध्ये फक्त राहतं काय तर फायबर्स बाकीचे जे पोषक तत्त्व आहेत ती सर्व नष्ट होतात .आणि त्यामुळे मग आपण आजारी पडतो आता माणूस केव्हापासून आजारी पडायल...
Image
                      कसे बनेल सुदृढ़ बालक  .   कसे बनेल सुदृढ़ बालक   मित्रांनो  आरोग्यम धनसंपदा  मध्ये आपले स्वागत आहे. आपले बालक गुट गुटित आणि सुदृढ़ असावे असे सर्वानाच वाटते.खालील टिप्स च्या साह्याने आपले बालक सुदृढ़ होण्यास नक्कीच मदत होइल.   रोगप्रतिकार शक्ती वाढवा! संसर्गजन्य रोग व इतर रोगांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तसेच, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी, पौष्टिक व सकस आहार गरजेचा आहे. वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा भाज्या आणि फळांचं सेवन मुबलक प्रमाणात करा साखर व मीठ यांचा वापर मर्यादित ठेवा तेल व स्निग्ध पदार्थांचं सेवन मोजकंच असू द्या शरीरात भरपूर प्रमाणात पाणी जाऊ दया. बालकाला मन मोकळेपणे खेलू दया. टीप.  या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य सूचनावर आधारित आहे. आरोग्यम धनसंपदा  याची पुष्टी करत नाही.याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञाशी सम्पर्क करावा  .

मध खाण्याचे फायदे व तोटे-honeybenefits

Image
  मध एक बहुगुणी औषध .   आयुर्वेदामध्ये 'मधाला'अनन्यसाधारण महत्व आहे. मित्रांनो  आरोग्यम धनसंपदा  मध्ये आपले स्वागत आहे.  आयुर्वेदामध्ये (honey) मधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. कोरोना कालामध्ये मधाचा औषध म्हणून जास्त प्रमाणात घरगुती स्वरूपात केला गेला . हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे,  ज्याचा आपण डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. कित्येक जण दूध आणि मध एकत्र करून त्याचे सेवन करतात. तर काही जण पाककृतींमध्येही मधाचा समावेश करतात. चवीसोबतच मधामध्ये शरीरास उपयुक्त असणारे  कित्येक पौष्टिक घटक आहेत. रोज योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला प्रचंड फायदे मिळतात. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. यातील पोषण तत्त्वांमुळे शरीर शुद्ध होते.झोपण्यापूर्वी  मधाचे सेवन कल्यास आपल्याला झोप शांत लागते   नियमितपणे मधाचे सेवन केले तर शरिरात स्फूर्ती, शक्ती आणि उर्जा येते. मधामुळे शरीर, सुंदर आणि सुडौल बनते. मध वजन घटवते आणि वाढवते देखील. मधामध्ये  ए, बी, सी,  व्हिटामीन    कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, असते....

दीर्घ_श्वासांचे_फायदे

Image
दीर्घ श्वास घ्या आनंदी रहा.  ताण ,तनाव टेंशन घलावन्याचा रामबाण ईलाज म्हणजे दीर्घ श्वसन   मित्रांनो  आरोग्यम धनसंपदा मध्ये आपले स्वागत आहे. मानसिक  स्थिती आणि शारीरिक स्थिती यांचा आपल्या श्वासाशी फार जवळचा संबंध असतो.श्‍वासाची गती वाढते त्यावेळी आपल्या शारीरिक मानसिक स्थिती मध्ये बदल घडतो. खेळताना, व्यायाम करताना मेहनतीचे काम करताना शरीराला ऑक्सिजन ची अधिक गरज असते अशावेळी आपण नकळतपणे खोल आणि दीर्घ श्वास घेतो यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.म्हणून दीर्घ श्वसन करणे गरजेचे आहे. यामध्ये आपल्याला योग प्राणायाम करणे आवश्यक आहे. १.कपालभाती प्राणायाम नियमितपणे करणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हे आपल्या शरीरातून विषारी हवा काढून टाकते. कपालभाती तुमचे यकृत आणि मूत्रपिंड कार्य सुधारते. हे मनाला शांत करते. श्वास घेण्याच्या तंत्रामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सामर्थ्य सुधारते. २.अनुलोम विलोम   श्वासोच्छ्वासाच्या माध्यमातून उजव्या आणि डाव्या नाड्या शुद्ध आणि संतुलित केल्या जातात. यामुळे संधिवात आणि सायनसायटिस कमी होतो. हे अॅलर्जी आणि दमा बरा करण्यास मदत करते. ३.भ्रामरी...

कसा असावा आपला आहार

Image
 कसा असावा आपला आहार  आपला आहार सात्विक सर्व चवीनी युक्त सात्विक पचावयास हलका असावा . नमस्कार मित्रानो  आज आपण 'आहार' या स्तंभाचा विचार करणार आहोत. जन्म ते मृत्यू या प्रदीर्घ प्रवासामध्ये शरीरव्यवहार सुरू राहण्यासाठी अन्नाची जरूरी आहे.ज्याप्रमाणे अग्नीला सरपण मिळाले नाही तर तो जळून जाईल तसेच शरीराला अन्न मिळाले नाही तर पोटातील अग्नी विझून जाईल. शरीराकरिता पंचमहाभूतात्मक (परंतु पृथ्वी आप महाभूत प्रधान) आहाराची आवश्यकता असते. अन्नाच्या सहा चवी(गोड, आंबट, खारट, कडू, तिखट, तुरट ) आहेत. यांनी आपला  आहार परिपूर्ण असला  पाहिजे. म्हणजे यंत्र व्यवस्थित काम करते तसे शरीरही सुरळीत काम करते. घेतलेले अन्न आवश्यक भाग शोषून घेऊन नको असलेला भाग टाकून देणे एवढा सगळा व्यापार शरीरच बघत असते. हे सर्व व्यापार बिघडवण्यास अन्नच कारणीभूत असते. पिण्याने माणूस म्हणजे कुळ होतो. नंतर प्यायल्याने स्थूल होतो. जेवणात मध्ये-मध्ये प्रमाणात घेतलेले पाणी अन्नसंघात मिसळून अमृतच ठरते.आहार घेत असतेवेळी सुद्धा आपले  किती अन्न  मागते . किती पचवू शकतो याचा थोडासा विचार करावा. आहाराचे जड ...